शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचे राज्यव्यापी आंदोलन; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह केजी ते पीजी मोफत व समान शिक्षणाची मागणी


मुंबई, प्रतिनिधी-  ( युवराज पाटील ) दि. 1 सप्टेंबर 2026 : राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्यालय बंद करू नये, प्रत्येक वर्गाला व प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र' यांच्या वतीने 5 ऑक्टोबर 2026 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. सिद्धार्थ जगदेव, तुषार सूर्यवंशी, संजय वेतुरेकर, दीप्ती शेलार, सुभाष मोरे, प्रवीण  किणे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई यांनी सांगितले की, "राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्या बंद होता कामा नये. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार असून ग. वाडी आणि वस्तीपर्यंत शाळा उपलब्ध राहिली पाहिजे."

निर्णयाला मंचाचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 20 पेक्षा कमी पटसंख्या असली तरी शाळा बंद न करता ती सुरु ठेवावी आणि एक विद्यार्थी असला तरी शाळा चालू ठेवावी, अशी मंचाची मागणी आहे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली

संचमान्यतेचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम करणारा संचमान्यतेसंदर्भातील शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी मंचाने केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध करुन देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पण्या