अतिशहाणपणा, अतिउत्साह अंगाशी येऊ शकतो

  

  • ratnagiri (1)

  • दापोली :अतिशहाणपणा, अतिउत्साह अंगाशी येऊ शकतो

  • पर्यटकांनो समुद्र काही स्टंट करण्याची जागा नाही!
  • या इनोव्हा कारसोबत काय झालं नक्की वाचा
  • अतिशहाणपणा, अतिउत्साह अंगाशी येऊ शकतो

दापोली : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात काल पर्यटकांनी अतिउत्साहात समुद्र किनाऱ्यावर नेलेली इनोव्हा गाडी बुडता बुडता वाचवण्यात यश आले. हर्णै बायपासच्या समोर किनाऱ्यावर काल मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कंपनीची गाडी घेऊन पर्यटक थेट पाण्यात गेले होते. सुरुवातीला वातावरण शांत होत पण नंतर जोरात विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. समुद्रात सायंकाळी भरती सुरु झाली. थोड्याचवेळात भरतीचे पाणी चढू लागले आणि गाडी पाण्यात बुडू लागली गाडीचा चालक गाडी बाहेर काढायला गेला पण ती वाळूत रुतू लागली.


यावेळी तातडीने ट्रॅक्टर बोलावण्यात आला तोपर्यंत गाडीचे टायर पाण्याखाली गेले होते. ट्रॅक्टर आल्यावर दोरखंडाच्या साहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने ती गाडी बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. परंतु पर्यटकांच्या या अशा अरेरावीचा वारंवार ग्रामस्थांना प्रत्यय येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सूचनांचे पालन न करता अतिशहाणपणा, अतिउत्साह अंगाशी येऊ शकतो.

प्रशासनाकडून सूचना फलक लिहिलेले असतात. परंतु या फलकांना कोणीही विचारतही नाही आणि बघतही नाही. यांच्या अरेरावी आणि दादागिरी मुळे अनेकदा मोठे अपघात वारंवार होत असतात. कोकणत फिरायला जायचं म्हटलं की दापोली किनारपट्टीला पर्यटक आवर्जून भेट देतात. थंड अल्लाहदायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोली तालुक्याला पर्यटनदृष्ट्या एक महत्वाचे स्थान आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातील पर्यटक फिरायला बाहेर पडू लागले आहेत. समुद्रावर आल्यावर पाण्यात पोहायला जाण्याचा मोह आवरेनासा होतो. तसेच आपली चारचाकी बीचवर नेऊन स्टंट करण्याचा मोहदेखील अनेकांना आवरत नाही. मोठ्या चारचाकी गाड्या घेऊन पुळणीवर जाऊन स्टंटबाजी करतात.यामुळे पर्यटनाचा आनंद जरूर घ्या पण सूचनांचे पालन करा,स्टंटबाजी जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेवा असे सांगण्याची वेळ आली आहे.

स्थानिक प्रशासन म्हणून हर्णै ग्रामपंचायतीने दोन सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. परंतु दोनच सुरक्षारक्षक असल्याने शनिवार, रविवार हे दोन दिवस गर्दी झाली की दोघांना पर्यटकांना आटोक्यात आणण कठीण होत. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर किमान शनिवार रविवार हे दोन दिवस तरी दोन ते तीन पोलीस सकाळी व सायंकाळी या संपुर्ण बीचवर लक्ष ठेवण्यासाठी दया, अशी मागणी दापोली पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे करणार आहोत अशी माहिती हर्णै ग्रा.पं. तीचे उपसरपंच महेश पवार यांनी दिली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org