रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची ४८ कोटी ५५ लाखांची विक्रमी थकबाकी
रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची ४८ कोटी ५५ लाखांची विक्रमी थकबाकी
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांनी केलेला भरमसाठ वीज वापार व त्यानंतर आलेली वीजबिले अद्यापही अनेकांनी न भरल्याचे चित्र आहे. या थकबाकीने मार्च महिन्यातील विक्रमी थकबाकीची नोंद केली असल्याने आता महावितरण कर्मचार्यांसमोर वसुलीचे मोठे उद्दिष्ट आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. रत्नागिरी खबरदार ला मिळालेल्या आकडेवारीनुसार एकट्या रत्नागिरी शहर उपविभागात ११५६२ ग्राहक थकीत असून यांच्याकडून ७ कोटी ४९ लाख रुपये थकबाकी आहे. जिल्ह्यातील थकबाकीचा आकडा प्रचंड असून जिल्ह्यातील ९८९७२ घरगुती ग्राहकांनकडून २० कोटी ४० लाख रुपये, ९९३९ वाणिज्य ग्राहकांची ८ कोटी १९ लाख थकबाकी, १३२५ औद्योगिक ग्राहकांची ५ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी असून उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून तब्बल १२२५६४ ग्राहक थकबाकीदार झाले आहेत आणि सुमारे ४८ कोटी ५५ लाख एवढी विक्रमी वीज बिलाची थकबाकी इतिहासात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी केली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment