जनता, अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे माध्यम म्हणजे आमसभा - आम. भास्करशेठ जाधव

आबलोली
 जवळ - जवळ या आमसभा हा विषय संपुष्टात येतो की काय ही भीती वाटते परंतु मी मात्र या आमसभेची परंपरा कायम ठेवली आहे.एकाच वेळेला जनता अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे एकमेव कारण आहे हे एकमेव माध्यम आहे अशी प्रतिक्रिया गुहागर येथील श्री. पूजा मंगल कार्यालय येथे आमसभा संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव बोलत होते. आम. भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की, जिथे अधिकारी हे लोकांना डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात, लोकप्रतिनिधी जनतेला डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात आणि एक चांगल्या प्रकारची विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीने या आमसभेचा उपयोग होतो म्हणून ही प्रथा आपण सोडलेली नाही 
                        जल जीवन मिशनवर बोलताना आम. भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पार बोजवारा उडालेला आहे हे मी म्हणतो म्हणून नाही तर शेवटी जे जलजीवन मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या दालनामध्ये मी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण हे पुराव्यानिशी आकडेवारीसह सिद्ध करून दाखवले आहे की जल जीवन मिशन ही योजना पूर्णपणे व्हॅल्यूवर झालेली आहे. या योजनेत प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे फार मोठी अनियमितता आहे चुकीचे आहे नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात आहे आणि काम कमी आणि पैशाची उचल मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे मी त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या देखत सिद्ध करून दाखवलं त्याच्यावर त्यांनी एक मंत्रालयातून चौकशी समिती नेमतो म्हणून सांगितले परंतु ती चौकशी समिती नेमली नाही याचं कारण बारक्या फणसाला म्हैस जामीन आहे 
                     विरोधी पक्षनेते पदासाठी आज काँग्रेसचे विजय वट्टेत्रिवार आणि इतर जे नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत कसं बघता याकडे या प्रश्नाला उत्तर देताना आम. भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की कसं आहे विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते त्यांची मुदत कालच्या 31 ऑगस्टला संपलेली आहे आणि आमच्या तीन पक्षांच्या बैठकीमध्ये ती जागा काँग्रेसला द्यायचे हा आमचा निर्णय झालेला आहे विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कडे राहील आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे जाईल आणि म्हणून अंबादास दानवे यांची मुदत संपल्यामुळे ते काल मान. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटले विधान परिषद सभापती राम शिंदेंना भेटले आणि आज जर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते स्वाभाविक आहे की शेवटी हा निर्णय सरकारनेच करायचा आहे संजय राऊत यांच्यावर नाराज असल्यामुळे बरेचसे आमदारे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे या प्रश्नावर बोलताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले की, मी तुमाने कोण ते ओळखत नाही.

Comments