*कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू; भारत, चीनच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू; भारत, चीनच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय!*
भारतातील भाविकांसाठीमहत्त्वाची असलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. 

 भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर असून चीनचे परराष्ट्र सचिव सुन वेईडाँग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसृत केलेल्या अधिकृत निवेदनात नमूद सांगण्यात आले.*

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्व लडाखमधून सैन्यमाघारीच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकषपणे आढावा घेतला गेला असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सोमवारी सुन वेईडाँग यांची भेट घेण्यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली.

 दोन्ही देशांनी एकमेकांबद्दल संशय आणि परकेपणा बाळगण्याऐवजी परस्पर सामंजस्य आणि सहाय्य असावे, त्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात असे वांग यांनी या भेटीत सुचवले.

पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षानंतर चिनी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करणे अवघड झाले होते. 

 अनेक लोकप्रिय चिनी ॲपवर बंदी घालण्यात आली आणि प्रवासी हवाई वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, व्यापारी वाहतूक सुरू होती.

*एकमेकांना सहकार्य*

🔴 कैलास मानसरोवर यात्रा २०२५च्या उन्हाळ्यापासून पुन्हा सुरू करणे

🔴 नवी दिल्ली आणि बीजिंगदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करणे

🔴 पत्रकार आणि विचारवंतांना व्हिसा देणे

🔴 दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांसंबंधी माहिती एकमेकांना देणे

● अन्य क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करणे

भारत आणि चीनदरम्यानच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दीर्घकालीन धोरण पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आर्थिक आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

  द्विपक्षीय संबंध स्थिर आणि दृढ करण्याच्या दृष्टीने विशिष्ट लोककेंद्रित पावले उचलण्यावर दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली आहे. *– परराष्ट्र मंत्रालय*
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments