*पाण्याबरोबरच पायाभूत सुविधा करुन ग्रामपंचायती आदर्श बनवा - उद्योगमंत्री उदय सामंत*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*पाण्याबरोबरच पायाभूत सुविधा करुन ग्रामपंचायती आदर्श बनवा - उद्योगमंत्री उदय सामंत*

 सरंपच आणि ग्रामसेवकांनी गावाचे कुटुंबप्रमुख जबाबदारी पार पाडताना स्वच्छ पाण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करावा. आरोग्याची सुविधा, शौचालयांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याचे स्वच्छ स्त्रोत याबाबत आदर्श ग्रामपंचायत बनवावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
            
जिल्हा परिषदेच्या स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात रत्नागिरी पंचायत समिती पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक झाली. बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
            
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींनी विशेषत: सरपंचांनी शौचालये अतिशय चांगल्या पध्दतीने आणि स्वच्छ राहतील याबाबत लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, ते स्वच्छ असावे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामसेवकांनी गावातील राजकारणापेक्षा विकासावर भर द्यावा. दिवंगत आर. आर. पाटील साहेबांनी तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव योजनेच्या माध्यमातून गावागावात अभियान राबविला. त्यादृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींवर अधिक भर द्यावा.
            
मिळालेले पाणी ग्रामस्थांपर्यंत स्वच्छ कसे पोहचेल, याचे नियोजन सरपंचांनी करावे. त्याचबरोबर भविष्यातील पाण्याचे नियोजनही आतापासूनच करावे. शाळांच्या इमारतींसाठी 90 कोटी आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 45 कोटी तालुक्यासाठी मंजूर झाले आहेत. शहरातील दामले विद्यालयासाठी 15 कोटी मंजूर झाल्याचे सांगून उद्योगमंत्री पुढे म्हणाले, येणाऱ्या पर्यावरण प्रकल्पांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. त्याचा निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी फायदाच होणार आहे. 
            
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रांताधिकारी श्री. देसाई आणि गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी ग्रामपंचायतींना पाणी टंचाईबाबत आढावा घेतला.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments