राज्यपालांना भेटण्यापूर्वीच शपथविधीची निमंत्रणपत्रिका तयार; काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात, "संविधानाला न...!"*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


राज्यपालांना भेटण्यापूर्वीच शपथविधीची निमंत्रणपत्रिका तयार; काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात, "संविधानाला न...!"*

नागपूर :-- विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून ११ दिवस झाले असून राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.*

संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील यात आता कोणतीही शंका नाही. 

 भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.

महायुतीतील प्रमुख नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पोहोचले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राजभवनात दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे समर्थनाचे पत्र दिले आहे. यावेळी आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, प्रविण दरेकर तसेच महायुतीतील अन्य महत्त्वाचे नेते राजभवनावर उपस्थित होते.

या सर्व घडामोडी दुपारी चारच्या सुमारास घडल्या. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मंडळातील सदस्यांच्या शपथविधीचे निमंत्रण समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले होते. 

 राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाने हे निमंत्रण प्रकाशित करण्यात आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर ५ डिसेंबरला ५.३० वाजता शिपथविधी सोहोळा आयोजित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

राज्यपालांनी महायुतीला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यापूर्वीच अशाप्रकारे निमंत्रणपत्रिका कशी प्रकाशित करण्यात आली, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

  सोबतच त्यांनी भाजप संविधानाला न मानणार पक्ष आहे. त्यांनी राज्यपालांचे अधिकार देखील आल्याकडे घेतले आहेत, असे या निमंत्रणपत्रिकेवरून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणूक निकाल २३ नोव्हेबरला लागला.

  बहुमत असून सरकार स्थापनेचा दावा केला गेला नाही. तब्बल ११ दिवस राज्यात कोणतेच सरकार नव्हते. राज्यात राष्ट्रपती शासन देखील लावण्यात आले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले. आम्ही तिघे मिळून एकत्र सरकार चालवणार असल्यांचे त्यांनी सांगितले. 

  महायुतीकडून सर्व निर्णय एकत्रित घेण्यात येतील असे ते म्हणाले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचेही आभार मानले.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments