*राज्यात 75 लाख मते कशी वाढली? निवडणूक अधिकाऱ्यांनी 'वंचित'ला दिले उत्तर!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*राज्यात 75 लाख मते कशी वाढली? निवडणूक अधिकाऱ्यांनी 'वंचित'ला दिले उत्तर!*


विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर 75 लाख मतदान झाले. 

 ही 75 लाख मते कशी वाढली? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन पक्षाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाला करण्यात आला होता. तीन जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून वंचितला उत्तर देण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

संध्याकाळी 6 नंतर खरच 75 लाख मतदान झाले का ?
आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ.(रिटर्निंग अधिकारी) यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण 75 लाख मते कशी वाढली याचे उत्तर मिळालेले नाही असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरओनी आमच्या पत्राला सरकारी पद्धतीची उत्तरे दिली आहेत. त्यातील समान भाग म्हणजे सदर माहिती दैनंदिन लिफाफामध्ये सील बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे आर. ओ यांनी उत्तरे दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, आम्ही लिहिलेल्या पत्रात 20 तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि 23 तारखेला सर्व मतदान जेव्हा मोजण्यात आले त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. 20 तारखेला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहानंतर 75 लाख मतदान झाले आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला होता.

सायंकाळी सहानंतर किती मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी. संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण पोलिंग बूथ वाईज स्लीप वाटली असेल, तर त्या किती वाटल्या याची माहिती द्या, कोणत्या अधिकारात आपण या स्लीप वाटल्या आहेत याबाबत माहिती द्या अशी मागणी आम्ही पत्र पाठवून निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही आंबेडकर सांगितले.

मतदान वाढीबाबत आम्हाला तीनही आरओ यांनी दिलेले उत्तरं ही सरकारी, समान आहेत. 

  त्यामुळे प्रश्न असा होतो 75 लाख मते खरेच झाली होती का ? कायद्यात एकदा सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटे झाले की निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागते, दरवाजे बंद करावे लागतात, जे आत मध्ये आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि जेवढ्या मतदारांना टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार असतो असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments