*‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’* मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती - भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’*
मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती - भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका
मराठा आरक्षणावरून अजूनही वाद धुमसत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. यावरून ओबीसी समाजाकडून मोठा विरोधी होत आहे. याच दरम्यान, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठा आणि ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या या विशेष रणनीतीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची विशेष रणनीती म्हणजे, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’ ही आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
हरियाणाच्या नुकत्याच निवडणूका पार पडल्या आणि निकालही जाहीर झाला. निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसने असे घोषित केले की, भाजप राज्यातून हद्दपार होणार आणि काँग्रेसचे सरकार येणार. मात्र, निकालादिवशी सर्व चित्र बदलले आणि काँग्रेस तोंडघशी पडली. भाजपने बहुमताचा आकडा पार करत राज्यात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. हरियाणाच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर काँग्रेसने आता महाराष्ट्राकडे नजर वळविली आहे.
राज्यात मराठा-ओबीसीच्या आरक्षणावरून सुरु असलेल्या वादावरून काँग्रेस नवी योजना आखण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मराठा-ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत पक्षाला मत मिळतील. निवडणुकीच्या पार्शभूमीवर काँग्रेसची मंगळवारी महत्वाची बैठक देखील पार पडली. दरम्यान, यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लिहिले, मराठा आणि ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची विशेष रणनीती म्हणजे… हिंदू समाजातील या दोन्ही घटकांमध्ये विष कालवायचे… त्यांच्यात फूट पडायची… आणि दोघांची मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा. हिंदू समाजाच्या जातीपातींमध्ये विष कालवूनच काँग्रेसने आजपर्यंत सत्ता मिळवली आहे. मात्र महाराष्ट्राचा सुजाण मतदार काँग्रेसचीही कुटील नीती यशस्वी होऊ देणार नाही एवढे नक्की, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment