शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे निधन*
*शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे निधन*
*आप्पा साळवी यांचा अल्प परिचय*
▪️शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
▪️रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या जडणघडणीत आप्पा साळवी यांचे महत्वाचे योगदान होते. सर्वप्रथम ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. त्यानंतर १९९० च्या काळात ते रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख होते. १९९५ ला राजापूर विधानसभा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवड आले. १९९५ ते १९९९ ते आमदार होते.
सोमवारी आप्पा साळवींची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत माळवली. आप्पा साळवी हे राजकारणातले अनेकांचे मार्गदर्शक होते.
▪️नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिवसभराच्या
व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार तसेच शिवसेनेच्या स्थापना काळातील शिलेदार श्री. विजय उर्फ आप्पा साळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट
घेतली. ९४ वर्षांचे आप्पा साळवी यांच्या प्रकृतीची आणि कुटूंबियांची आस्थेने विचारपूस करून त्यांचे आशिर्वाद घेतले.
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय
सामंत हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
▪️आप्पांचा जन्म 23 मार्च, 1930 रोजी रत्नागिरी येथे झाला.
▪️अप्पांचे शिक्षण रत्नागिरीतील माळनाका परिसरातील त्यावेळेच्या ट्युटोरियल स्कूल व नंतर पटवर्धन हायस्कूल येथे झाले. पुढे त्यांनी इंटरपर्यंत शिक्षण रत्नागिरीतील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून घेतले. त्यावेळी ते कॉलेजच्या
क्रिकेट संघाकडून खेळत असत. दरम्यान अप्पांनी स्वतःच ट्रान्स्पोर्ट व्यवसाय सुरू केला. परंतु त्यादरम्यान सेंट्रल रेल्वेत नोकरी मिळाल्यामुळे ते रेल्वेमध्ये मुंबई येथे रुजू झाले.काही काळ नोकरी केली. दरम्यान शिवसेना स्थापनेची घोषणा स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि रेल्वेतील
नोकरीचा राजिनामा देऊन शिवसेनेचे शिवसैनिक झाले त आजपर्यंत!! आप्पा शिवसेनेच्या स्थापनेत बाळासाहेबांच्या
सोबतच होते!!!
▪️पुढे शिवसेनेच्या वाढीसाठी बाळासाहेबांच्या आदेशाने रत्नागिरी गाठली आणि शिवसेना रत्नागिरी
जिल्ह्यात रुजविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. जागोजागी शाखा स्थापना करणे वगैरे कामांमध्ये अप्पा सक्रिय असत.
▪️जयसिंगराव चव्हाण रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख असताना आप्पा उपजिल्हाप्रमुख होते.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment