पतीला मर्जीत ठेवण्यासाठी जादूटोणा, बादलने महिलेकडून उकळले तब्बल ६० लाख
![]()
Mumbai Crime News : पती केवळ त्याच्या कुटुंबीयांच्या सांगण्याप्रमाणेच वागत असल्याने तो आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी पत्नीचे एका ज्योतिषाला गाठले. त्याने पतीला जादूटोण्याने वश करून ठेवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून दागिने आणि रोख असे तब्बल साठ लाख या महिलेकडून उकळले....
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पती केवळ त्याच्या कुटुंबीयांच्या सांगण्याप्रमाणेच वागत असल्याने तो आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी पत्नीचे एका ज्योतिषाला गाठले. त्याने पतीला जादूटोण्याने वश करून ठेवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून दागिने आणि रोख असे तब्बल साठ लाख या महिलेकडून उकळले. यामुळे चिडलेल्या पतीने ज्योतिषाविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली.
अंधेरीमध्ये रामजी (बदललेले नाव) यांचा प्रिंटर आणि कार्टेज विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रमा (बदललेले नाव) आणि दोन मुलांसह रामजी पवई येथे एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी दिवाळीमध्ये कर्मचारी आणि इतरांना दिवाळी बोनस देण्यासाठी ३५ लाख रुपयांची रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही रक्कम काढण्यासाठी त्यांनी कपाट उघडले असता, यामधून रोकड गायब होती. त्यांनी पत्नीला याबाबत हटकले असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या मोठ्या भावाला सांगितला. दोन्ही भावांनी मिळून रमाला विश्वासात घेतल्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.
पती फक्त आपलेच कसे ऐकतील, याचा विचार करत असताना इन्स्टाग्रामवर बादल शर्मा या ज्योतिषाची ओळख झाली. बादल याने जादूटोणा करून रामजी यांना वशमध्ये ठेवता येईल, मात्र त्यासाठी खर्च करावा लागेल, असे सांगितले. यासाठी घरातील एकेक दागिना आणि नंतर रामजी यांनी घरामध्ये ठेवलेली ३५ लाखांची रोख रक्कम असा सुमारे साठ लाखांचा ऐवज बादल याला दिला, असे रमाने सांगितले. हे ऐकल्यानंतर रामजी याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पूर्वीच्या प्रियकराची मदत
लग्नापूर्वी रमा हिचे रूपेश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याने रमा आणि रामजी यांच्यात वाद व्हायचे. अखेर रामजी यांच्या कटुंबीयांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण मिटवले होते. मात्र पतीवर जादूटोणा करण्यासाठी रमा हिने रूपेशची मदत घेतल्याचे समोर आल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
लग्नापूर्वी रमा हिचे रूपेश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याने रमा आणि रामजी यांच्यात वाद व्हायचे. अखेर रामजी यांच्या कटुंबीयांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण मिटवले होते. मात्र पतीवर जादूटोणा करण्यासाठी रमा हिने रूपेशची मदत घेतल्याचे समोर आल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा