वडद येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

 Cheetah - Wikipedia

गुहागर : तालुक्यातील वडद-डाफळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे-बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले ही वाढत आहेत. गुहागर तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे राजाराम भाग्या जोगळे यांनी मंगळवारी सकाळी गुरे चरण्यासाठी जंगलात सोडली होती. मात्र, दुपारी गुरे आणण्यासाठी ते जंगलात गेले असता त्यातील ६ गुरे घरी परत आली तर ३ गुरे घरी न आल्याने श्री. जोगळे यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी दोन पाडे बिबट्याच्या हल्ल्या मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसून आले तर १ पाडा जंगलामध्ये जिवंत आढळला. बिबट्याच्या हल्ल्या मृत्युमुखी पडलेल्या पाठ्यांमध्ये एक १८ महिन्यांचा तर एक १० महिन्यांचा पाडा असल्याचे शेतकरी राजारा जोगळे यांनी सांगितले.

एकिकडे अवकाळी पाऊस 'लम्पी'सारखे आजार असताना जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अशा प्रकारे पाळीव जनावरांवर हल्ले होऊन मृत्युमुखी होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Comments