द्वारा पोस्ट केलेले
MANGOCITY FRESH NEWS
‘मनसेकडेही खोके पोहोचले का?, भोंगा, टोल आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरे गटाची टीका

ठाकरेगटाच्या वतीने मनसेवर टीका करण्यात आली आहे.
औरंगाबाद : ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे… एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याता महाराष्ट्राचा महासंकल्प’, अशी जाहिरात आजच्या सामनाच्या पहिल्या पानावर छापून आली आहे. त्यावरून मनसेने (Raj Thackeray) उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. खोके सामनाच्या ऑफिसपर्यंत पोहोचले का? असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केलीय. त्याला आता ठाकरेगटाच्या वतीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मनसेच्या आंदोलनांचा दाखला देत त्यांना प्रश्न विचारण्यात आलाय.
मनसेनं टोलविरोधात आंदोलन केलं. राज ठाकरे भोंग्यांवर बोलले. पण आता ते अगदी शांत आहेत. याचा ‘राज’ काय? मनसेकडेही खोके पोहोचले का? असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केलीय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा