मुंबईकरांसाठी गुड न्यूज! भाडे नाकारणे रिक्षा-टॅक्सी चालकांना महागात पडणार, पोलिसांनी दिला 'हा' आदेश
![]()
Mumbai Auto Taxi News: टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून सर्रास भाडं नाकारलं जाण्याच्या घटना मुंबईत वारंवार घडतात. अनेकदा, रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही रिक्षा - टॅक्सी चालकांच्या या मुजोरीचा सामना करावा लागतो.
मुंबईः टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून सर्रास भाडं नाकारलं जाण्याच्या घटना मुंबईत वारंवार घडतात. अनेकदा, रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही रिक्षा - टॅक्सी चालकांच्या या मुजोरीचा सामना करावा लागतो. मात्र, आता मुंबई पोलिसांच्या एका आदेशामुळं मुंबईकरांचा त्रास कमी होणार आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी एक मोहिम सुरू केली असून त्याबाबत एक पत्रक काढले आहे.
मुंबईत अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध असतानाही भाडे नाकारले जाते. मात्र आता त्याला नियंत्रण बसणार आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
मुंबईत अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध असतानाही भाडे नाकारले जाते. मात्र आता त्याला नियंत्रण बसणार आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांची एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या बैठकीत ते याबाबत माहिती देण्यात येणार यावी, असे आदेश दिले आहेत. जर भाडे नाकारण्याची तक्रार आलीच तर संबंधितांवर मोटार वाहन कायदा १७८(३) अन्वये कारवाई करण्यात यावी, असं आदेशही पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. भाडे नाकारल्याची तक्रार आल्यावर संबंधितांवर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित, असं या आदेशात म्हटलं आहे. तसंच, हे फलक रेल्वे आणि बस स्थानकाबाहेर लावण्यात आले आहेत. त्यामुळं आता रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसेल अशी आशा आहे.
Comments
Post a Comment