आठवडा बाजार ते काँग्रेस भुवन रस्त्याचे काम एका रात्रीत

 रत्नागिरी : भाजप आणि काँग्रेसच्या रेट्याने अखेर आठवडा बाजार ते काँग्रेसभवन दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. ठेकेदाराने रस्त्याचे एवढे निकृष्ट काम केले होते की, अवघ्या चार महिन्यात रस्त्याची वाताहत झाली. रस्त्यात एवढे खड्डे पडले की वाहनधारकांना कसरत करत येथून वाहने चालवावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यादरम्यान तात्पुर्ती मलमपट्टी करण्यात आली होती, तिही काही दिवसात उखडली. दोन्ही पक्षानी हा विषय लावून धरल्यानंतर पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस बजवाल्यानंतर ठेकेदार वठणीवर आला आणि एका रात्रीत हे काम झाले.

 

सुधारित पाणी योजना आणि सीएनजी गॅस पाइपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वीच म्हणजे चार महिन्यांपूर्वी शहरातील रस्ते २९ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. परंतु पहिल्या | पावसातच या रस्त्यांची वाताहत झाली. रस्ते करताना शहराचे माळनावयापासून वर आणि खाली, असे दोन भाग करण्यात आले. माळनाक्यापासून खाली जाहिद खान या ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता. या भागातील रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्यामुळे चार महिन्यात ते उखडले, असा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला. त्यानंतर काही भागात मलमपट्टी झाली. परंतु आठवडा बाजार ते काँग्रेसभवन या रस्त्याची अवस्था भयानक झाली होती. या भागातून खड्डे चुकवून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच. त्यामुळे कॉंग्रेसने या रस्त्याविरोधात आंदोलन केली. त्यानंतर श्रमदानातून खड्डे भरण्यात आले. तरी पालिक प्रशासनाला जाग आली नाही.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महामार्गाची पाहणी करून आठवडा बाजार येथील भाजपच्या कार्यालयाला भेट देणार होते.

त्यामुळे भाजपणे या रस्त्याविषयी पालिका प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर तातत्पुर्वी मलमपट्टी करण्यात आली. मात्र तिही पावसामुळे लगेच धुऊन गेली. ठेकेदारच्या या भोंगळ आणि निकृष्ट कामाबद्धल भाजप आक्रमक झाला. मुख्याधिकाऱ्यांना भेटून तत्काळ या रस्त्याचे काम करण्यास सांगितले. मात्र ठेकेदाराने प्रशासनाला उडवून लावले होते.. भाजप आणि काँग्रेसच्या रेट्याने पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस काढल्यानंतर त्याची दखल घेऊन आठवडा बाजार ते काँग्रेसभवन हा रस्ता करण्यात आला

Comments