संजय राऊत नारदमुनी, तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंची टोलेबाजी

बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे.
शहाजीबापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसत आहे. राजसाहेबांच्या पत्राची दखल फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली, असं सांगतानाच संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहेत, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून अभिजीत पाटील यांच्याबाबत विधान केल. पण आपण निवडूनच येणार. माझी विधानसभा निवडणुकीत माघार नाही. सगळे विरोधक मिळून या.भुगा करुन तुम्हाला निवडणुकीत पाडून मी पुन्हा आमदार म्हणून मुंबईला जाईल, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने भारत जोडो यात्रेला निमंत्रण दिलं आहे. पण उद्धव ठाकरे यांचं काँग्रेससोबत जाणं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरही भाष्य केलं. बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी होती. त्यासाठी त्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांचं पत्रं हे स्क्रिप्टेड आहे
Comments
Post a Comment