मी कोणते कांड करत नाही ज्यामुळे खळबळ माजेल; २० वर्षांनतर माझे, असं का म्हणाला मराठमोळा अभिनेता
![]()
![]()
Sharad Kelkar Interview: हिंदी चित्रपट गाजवणारा मराठमोळा अभिनेता 'शरद केळकर' मराठी सिनेमा करतोय. 'हर हर महादेव'च्या माध्यमातून त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
या सिनेमाविषयी बोलताना शरद केळकर म्हणाला की, 'महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो. या सिनेमाद्वारे आम्ही स्वराज्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या भारतीय इतिहासाची ती पाने वाचण्याचा प्रयत्न केला आहे. आजकाल अमेरिकन इतिहास खूप शिकवला जातो. पण या सिनेमातून आपल्या देशाचा इतिहास आणि वीरांच्या गाथा मांडाव्यात अशी आमची कल्पना होती. छत्रपती शिवरायांचे निष्ठावान सहकाही बाजीप्रभू देशपांडे यांची कथा 'हर हर महादेव' मध्ये दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.'
आजकाल ऐतिहासिक किंवा जुना काळ दाखवणाऱ्या पीरिएड फिल्म्स खूप बनत आहेत. याविषयी बोलताना शरद म्हणाला की, 'आजकालल पिरियड फिल्म्स खूप बनत आहेत. अभिनय आणि कलाकारांच्या माध्यमातून हे चित्रपट आपल्याला अशा काळात घेऊन जातात जो काळ आपण आज अनेक वर्षांनी जाणून घेऊ शकतो. मला असेही वाटते की आपल्याला इतर देशांच्या इतिहासाबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे, मग आपण आपल्या देशाबद्दल का जाणून घेऊ नये आणि एखाद्याने त्याविषयी का सांगू नये.'
दरम्यान 'हर हर महादेव' (Sharadd Kelkar on Har Har Mahadev Movie) या सिनेमाबाबत खूप उत्सुक असल्याचेही शरद यावेळी म्हणाला. या सिनेमाने एक मोलाची गोष्ट अभिनेत्याला दिली. त्याने असे म्हटले की, 'मी एका छोट्या गावातून इथे आलो आहे. आज २० वर्षांनंतर प्रत्येक शहरात माझे होर्डिंग आणि पोस्टर्स लागले आहेत. ते पाहून भावुक व्हायला होते. मी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे.'
शरद केळकरने 'हर हर महादेव' हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार दिग्दर्शक एस एस राजामौली यांना समर्पित केला आहे. त्याने असे म्हटले की, 'मी एसएस राजामौली यांच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करतो. ते अशा प्रकारचे व्यक्ती आहेत, जे चित्रपटाबद्दल जसा विचार करतात तसाच सिनेमा ते बनवतात. ते कधीही कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करत नाहीत आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे घेऊन येतात. आम्ही 'हर हर महादेव' फक्त एसएस राजामौली यांना समर्पित करतो.'
Comments
Post a Comment