मस्तवाल भेळ विक्रेत्याने ग्राहकावरच हात उचलला, ग्राहकाचे कुटूंब उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
रत्नागिरीतील मांडवी समुद्र किना-यावरिल एका मस्तवाल भेळ विक्रेत्यानेच आलेल्या ग्राहकाला मारल्याची घटना गुरुवारी 5 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सदर ग्राहक व त्यांच्या मुलग्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शहर पोलिस प्रशासनाकडून त्या भेळ विक्रेत्याची सखोल चौकशी करुन कारवाई केली जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
गुरुवारी सायंकाळी मांडवी येथे गेलेल्या एका कुटुंबातील नातेवाईकांनी भेळ, पाणीपूरी खायची ठरवली. भेळवाल्याकडे गेल्यावर पाणीपुरी, आदी मागितले. चवित फरक जाणवला. तो ग्राहकांनी सांगितला. तीच बाब भेळ विक्रेत्याला खटकली. तो म्हणाला की मी इतके वर्षे व्यवसाय करतोय. तुम्ही काहितरी काय बोलताय. असे बोलून समोरच्या ग्राहकावर हात उचलला. सदरची माहीती त्या ग्राहकानेच सांगितली. या हातापायीमध्ये लहान मुलालाही मारले. या रुग्णाना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर तिथे पोलिस चौकित पोलिसाच उपस्थीत नव्हते. त्यामुळे तक्रारदाराना तक्रार कुठे करायची हा प्रश्न पडला. सदरची माहीती त्या ग्राहकानेच सांगितली.
अशी घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून मांडवी भेळ विक्रेत्यांना काही नियमावली लागू केली जाणार का? भेळ, पाणी पूरी खाल्ल्यानंतर दुकानदारांकडून ग्राहकाना रितसर पावती मिळणार का?, ग्राहकांसोबत कसे वागावे याबाबत काही नियमावली दिली जाणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
Comments
Post a Comment