१५ विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र!

दहावी बरावी परीक्षा:
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यात आणखी भर पडणार नाही, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच आणि ऑफलाईनच होईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी-बारावीची पटसंख्या 15 असलेल्या ठिकाणी एक स्वतंत्र परीक्षा केंद्र असेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले.

दहावी-बारावीसाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 70 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दीडशेहून अधिक विषयांची आठ माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अडथळा असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार आहेत. कोरोनाचा  संसर्ग वाढेल, अशी शक्‍यता वर्तविल्याने परीक्षा 4 मार्चनंतर घेण्याचे नियोजन होते. परंतु, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग आता कमी झाल्याने परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे.

Comments