कर्णधार ऋतुराज गायकवाडचा नाद करायचा नाही; केला मोठा पराक्रम

नवी दिल्ली:
भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा पुण्याचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड  एक मोठा पराक्रम केलाय.भारतीय वनडे संघाकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आता विजय हजारे ट्रॉफी अनोखी कामगिरी करून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. केरळविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ऋतुराजने शतकी खेळी केली. त्याचे हे शतक खास असे ठरले आहे.
ऋतुराजचे विजय हजारे स्पर्धेतील गेल्या ३ सामन्यातील हे तिसरे शतक ठरले आहे. त्याने ३ डावात मिळून आतापर्यंत ४१९च्या पुढे धावा केल्या आहेत. केरळविरुद्धच्या सामन्यात त्याने १२४ चेंडूत १२९ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. याआधी ऋतुराजने ११२ चेंडूत १३६ आणि १४३ चेंडूत नाबाद १५४ धावांची खेळी केली होती.
या वर्षी विजय हजारे स्पर्धेत ऋतुराजकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देण्यात आले आहे. कर्णधार म्हणून ऋतुराजने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवून दिला आणि शतकासह विजयाच महत्त्वाचा वाटा देखील उचलला आहे. गेल्या काही महिन्यात ऋतुराजने शानदार कामगिरी केली असून आयपीएल २०२१ मध्ये त्याने सर्वाधिक ६३५ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याने फाफ डुप्लेसिस सोबत चेन्नईला चौथे विजेतेपद मिळून देण्यात मोठा हातभार लावला होता. २४ वर्षीय ऋतुराजला चेन्नई सुपर किंग्ज संघाने पुढील वर्षासाठी रिटेन देखील केले आहे.

Comments