जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पचा मार्ग मोकळा
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली:-
देशात सहा अणुभट्ट्या उभारण्यास केंद्र सरकार ने तत्वत: मंजुरी दिली आहे. सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील जैतापूर सह इतर प्रस्तावित अणुऊर्जा भट्ट्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येकी १,६५० मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत. एकूण ९,९०० मेगावॅट क्षमतेसह हे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे ठिकाण असेल, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली.
महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, सरकार फ्रेंच फर्म ईडीएफ सोबत प्रकल्प प्रस्तावावर पोहोचण्यासाठी तांत्रिक-व्यावसायिक चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले.
अणुऊर्जा स्वच्छ व पर्यावरणास अनुकूल आहे. त्याशिवाय देशाची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा शाश्वत आधारावर सुनिश्चित करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे सिंह म्हणाले. अणुऊर्जा प्रकल्पांनी आतापर्यंत सुमारे ७५५ अब्ज युनिट वीज निर्माण केली आहे. ज्यामुळे सुमारे ६५० दशलक्ष टन सीओ २ उत्सर्जनाची बचत झाली आहे.
Comments
Post a Comment