रत्नागिरी जिल्ह्यात न्यायालयाकडून ३६ आरोपी फरारी घोषित, १३६ संशयितांच्या शोधात जिल्हा पोलीस




 रत्नागिरी जिल्ह्यात  न्यायालयाकडून ३६ आरोपी फरारी घोषित, १३६ संशयितांच्या शोधात जिल्हा पोलीस


खून, दरोडे, चोरी, हाणामार्‍या या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने जामीनावर सोडलेले जिल्ह्यातील तब्बल ३६ आरोपी गेल्या दहा वर्षात फरारी आहेत. तर विविध गुन्ह्यात संशयित म्हणून संशयितांचे लक्ष असलेले सुमारे १३६ जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

खून, दरोडे, चोर्‍या या गुन्ह्यांमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षात शेकडो आरोपींना जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांतून अटक झाली होती. अनेक वेळा न्यायालयाने गुन्हेगारांना जामीनावर सोडले. चोरी, दरोड्यांच्या गुन्ह्यात स्थानिकांपेक्षा परराज्यातील गुन्हेगारांचा मोठा समावेश आहे. जामीनावर सुटल्यानंतर ते परत न्यायालयात हजर होत नाहीत.

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात आरोपी असलेले सुमारे ३६ जण न्यायालयाने घोषित केले आहे. गतवर्षी १० फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तर यावर्षी शहर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. तरीही ३६ जणांची प्रतिक्षा पोलिसांना आहे. 

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या