“आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार”, विनायक राउतांचा नारायण राणेंवर पलटवार!


vinayak raut on narayan rane

“आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार”, विनायक राउतांचा नारायण राणेंवर पलटवार!


कोकणातल्या चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलं आहे. चिपी विमानतळाचं श्रेय नेमकं कुणाचं? यावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. विमानतळासाठी शिवसेनेकडून कोकणात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळाचं पूर्ण श्रेय भाजपाचं असल्याचा दावा केला आहे. शिवाय, उद्घाटनावेळी मोठा भांडाफोड करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विमानतळाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असताना आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही

नारायण राणेंनी शिवसेनेकडून आणि विशेषत: विनायक राऊत यांनी केलेल्या पोस्टरबाजीवर निशाणा साधला होता. त्याविषयी बोलताना विनायक राऊत म्हणाले, “प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा दिवस आनंदाचा आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. १९९९ साली विमानतळाची सुरूवात झाली. २००३ साली पहिलं आणि २००९ साली दुसरं भूमिपूजन झालं. त्यांनी भूमिपूजन करण्याचं काम अनेकदा केलं. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात २०१६पासून झाली”, असं विनायक राऊत म्हणाले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या