आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न!

 


आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न!

आंदोलक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला असून या कटात सहभागी असलेल्या सर्वांना तातडीने अटक झाली पाहिजे.

उत्तर प्रदेशातील घटनेवरून योगी-मोदी सरकारवर काँग्रेसचा आरोप

लखीमपूर खेरीमधील हिंसाचार हा दिवसाढवळ्या केलेली हत्या असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

आंदोलक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला असून या कटात सहभागी असलेल्या सर्वांना तातडीने अटक झाली पाहिजे. ही सामान्य घटना नसून डोळ्यादेखत झालेली हत्या आहे. मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे, अशी मागणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री व उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेले निरीक्षक भूपेश बघेल यांनी सोमवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली.

शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्यांना योगी सरकारने मोकाट सोडले असून केंद्रातील मोदी सरकारचाही त्यांना पाठिंबा आहे. लखीमपूर खेरीतील हत्याकांडाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चकार शब्द काढलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये व अन्य भाजपशासित राज्यांमध्ये जंगलराज निर्माण झाले असल्याची टीका संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी निवेदनाद्वारे केली.

धक्काबुक्की-नाकाबंदी

लखीमपूरमधील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा व दीपेद्र्र सिंह हुडा यांच्या ताफ्याला पोलिसांनी सीतापूरमध्ये अडवले. दीपेंद्र हुडा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे प्रियंका गांधीही कारमधून बाहेर आल्या. त्यांनाही धक्काबुक्की केली गेली व अटक करून पोलीस त्यांना घेऊन गेले. अर्धा तास प्रियंका गांधी-वाड्रा यांना कुठे नेण्यात आले हेही समजत नव्हते, अशी माहिती काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. लखीमपूरमध्ये घटनास्थळी भेट देण्यासाठी लखनऊला पोहोचलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना विमानतळावर उतरण्यासही मज्जाव केला गेला, असेही शुक्ला म्हणाले.

शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना निवेदन

लखीमपूरमधील हिंसाचार हा सुनियोजित कटाचा भाग असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ र्कोंवद यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी व हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल तसेच, सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्याविरोधात खटला चालवला जावा. मिश्रा यांचे पुत्र आशीष व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, या हिंसाचाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाद्वारे चौकशी केली जावी तसेच, घटनात्मक पदावर असताना हिंसाचाराला प्रवृत्त केल्याप्रकरणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही हकालपट्टी करावी, अशा प्रमुख चार मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.   

भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर हल्ले -पायलट

मुंबई : उत्तर प्रदेश, हरियाणा या भाजपची सरकारे असलेल्या राज्यांमध्येच शेतकऱ्यांवर अन्याय-अत्याचार, हल्ले होत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते  सचिन पायलट यांनी के ला. मुंबई दौऱ्यावर आलेल्या सचिन पायलट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेचा संदर्भ देत, भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न के ला जात, त्यांच्यावर हल्ले  के ले जात आहेत, अशी टीका के ली. 

((लखीमपूर  येथील हिंसाचाराची घटना, तसेच प्रियंका गांधी यांना झालेली अटक, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सोमवारी आंदोलन करण्यात आले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments