वृद्ध शेतकरी दाम्पत्याची विष घेऊन आत्महत्या

वृद्ध शेतकरी दाम्पत्याची विष घेऊन आत्महत्या
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावच्या शिवारात एका वृध्द शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही.
पोपट बाबुराव मुळे (वय ६५) आणि कमलबाई पोपट मुळे (वय ५७) अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. खंडाळी गावच्या शिवारात मुळे दाम्पत्य स्वत:ची शेती करीत होते. काल गुरुवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून मुळे पती—पत्नी घरातून बाहेर पडले. रात्री उशीर झाला तरी पुन्हा घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. रात्रभर शोधूनही मुळे दाम्पत्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी, दुसरम्य़ा दिवशी पुन्हा शोध सुरू झाला असता आपल्याच शेतातील टोमॅटोच्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाखाली मुळे दाम्पत्य बेशुध्दावस्थेत पडलेले आढळून आले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता. कोणते तरी कीटकनाशक प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment