स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम
पाच लाख नागरिकांच्या स्वाक्षरी द्वारे भारत सरकारकडे निवेदन देणार
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
भारत स्वातंत्र व्हावा यासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे , भाषाशुद्धी , लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री सक्षमीकरण करणाऱ्या शिक्षण सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून मागणी पुढे येत आहे. अनेक संस्था , सामाजिक कार्यकर्त्यानी भारत सरकारला निवेदन दिले मात्र केंद्र सरकार कडून अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात ज्यांनी भारत स्वातंत्र्य व्हावा व मुलींना शिक्षण घेता याव यासाठी जीवन चळवळीत घालवणाऱ्या अशा विभूतींना भारतरत्न ही पुरस्कार प्राप्त पदवी असून भारताचा तो गौरव आहे . सामाजिक कार्यकर्ते वैभव आवटे पाटील आणि राजेंद्र पवार यांच्या वतीने घाटकोपर मध्ये पाच लाख लोकांच्या सह्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत सरकारने भारतरत्न द्यावा या मागणीसाठी विभागात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पाच लाख नागरिकांच्या स्वाक्षरी द्वारे भारत सरकारकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते वैभव आवटे पाटील आणि राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा