रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण
भांडी,कुंडी कपडयांसाठी प्रति कुटुंब 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान
रत्नागिरी : जिल्हयामध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.या आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना मदत सुरु करण्यात आली असून यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनाही मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.ज्या नागरिकांचे भांडी,कुंडी व कपडयांचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रती कुटुंब 5 हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सद्यास्थितीत जिल्हयामध्ये 57 ठिकाणी 1712 लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयास राहत आहेत. त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन, पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना 01 ऑगस्ट 2021 अखेर पर्यंत 86 गावातील एकूण 1626 कुटूंबांना 162.60 क्विंटल गहु व 162.60 क्विंटल तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण 37 गावातील 304 कुटूंबांना 1520 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 01 ऑगस्ट 2021 अखेर एकूण 25 हजार 665 लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण 104 सामाजिक संस्था व 21 व्यक्तींनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत मदत केली आहे.
--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment