‘..तरच मिळणार महाराष्ट्रात प्रवेश’ ; पाहा काय आहेत नवे नियम

‘..तरच मिळणार महाराष्ट्रात प्रवेश’ ; पाहा काय आहेत नवे नियम

‘..तरच मिळणार महाराष्ट्रात प्रवेश’ ; पाहा काय आहेत नवे नियम

महाराष्ट्रात शनिवारपासून कोरोना व्हायरस अनलॉक  प्रक्रियेच्या नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे नियम (guidelines)बनवले आहेत. याच अंतर्गत आता महाराष्ट्रातील प्रवेशाबाबतच्या (Entry into Maharashtra) निर्णयातही मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीचे दोन्ही डोस  घेणं गरजेचं असणार आहे

लसीच्या दोन्ही डोसमध्ये 14 दिवसांचं अंतर असणंही गरजेचं आहे. यासोबतच पुरावा म्हणून तुम्हाला तुमच्याजवळ लसीकरण प्रमाणपत्रही (Vaccination Certificate) ठेवावं लागेल. लस घेतली नसेल तर अशा स्थितीत आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR Report) दाखवणं गरजेचं असेल. या नियमांचं पालन न करणाऱ्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहावं (guidelines) लागेल. महाराष्ट्र सरकारनं कोरोना नियम काही प्रमाणात शिथील करत 15 ऑगस्टपासून मॉल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, यासोबतच ही अटदेखील आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. याशिवाय दुकानंदेखील रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. स्पा आणि जिमलादेखील या अटीवर 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली की सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments