जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला गती मिळणार रिएक्टर्सच्या बांधकामास केंद्र शासनाची मंजूरी
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला गती मिळणार रिएक्टर्सच्या बांधकामास केंद्र शासनाची मंजूरी
राजापूर :- केंद्र सरकारने दहा स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिली आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील बहुचर्चित अशा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळ रखडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आता चालना मिळणार आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एकूण ८ गिगावॅटच्या १० अणुभट्ट्यांवर काम चालू आहे. केंद्र सरकारने १० स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स च्या बांधकामास एकूण ७ गिगावॅटच्या फ्लीट मोडमध्ये उभारण्यासाठी आर्थिक मंजुरी दिली आहे. अणुऊर्जा आणि अवकाश प्रभारी राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारताकडे ६ हजार ७८० मेगावॅटची स्थापित क्षमता असलेले २२ व्यावसायिक अणुऊर्जा अणुभट्ट्या आहेत. ज्या न्यूक्लियर पॉवर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे चालवल्या जातात.
भारत सरकारने यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर, कोवाडा .आंध्रप्रदेश), छाया मिठी विर्डी .गुजरात), हरिपूर .पश्चिम बंगाल आणि भीमपूर .मध्यप्रदेश मध्ये एकूण २५,२४८ मेगावॅट अणुऊर्जा क्षमता स्थापित करण्यास मुख्यत मान्यता दिली आहे. सन २००८ च्या नागरी आण्विक करारामुळे भारताला त्याच्या आण्विक अलगावमधून बाहेर काढण्यात अमेरिकेचा मोलाचा वाटा होता. निमार्णाधीन आणि मंजूर प्रकल्पांच्या प्रगतीशील पूर्णतेवर २०३१ पर्यंत आण्विक क्षमता २२ हजार४८० मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भविष्यात आणखी अणुऊर्जा प्रकल्पांचीही योजना आहे, असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन गावी होत असलेल्या १० हजार मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्पाचे काम जमीन अधिग्रहणानंतर संथपणे सुरू आहे. मागील काही वर्षात तर हे काम ठप्पच झाले होते. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र आता केंद्र शासनाने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील रिएक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एकूण ८ गिगावॅटच्या १० अणुभट्ट्यांवर काम चालू आहे. केंद्र सरकारने १० स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स च्या बांधकामास एकूण ७ गिगावॅटच्या फ्लीट मोडमध्ये उभारण्यासाठी आर्थिक मंजुरी दिली आहे. अणुऊर्जा आणि अवकाश प्रभारी राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारताकडे ६ हजार ७८० मेगावॅटची स्थापित क्षमता असलेले २२ व्यावसायिक अणुऊर्जा अणुभट्ट्या आहेत. ज्या न्यूक्लियर पॉवर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे चालवल्या जातात.
भारत सरकारने यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर, कोवाडा .आंध्रप्रदेश), छाया मिठी विर्डी .गुजरात), हरिपूर .पश्चिम बंगाल आणि भीमपूर .मध्यप्रदेश मध्ये एकूण २५,२४८ मेगावॅट अणुऊर्जा क्षमता स्थापित करण्यास मुख्यत मान्यता दिली आहे. सन २००८ च्या नागरी आण्विक करारामुळे भारताला त्याच्या आण्विक अलगावमधून बाहेर काढण्यात अमेरिकेचा मोलाचा वाटा होता. निमार्णाधीन आणि मंजूर प्रकल्पांच्या प्रगतीशील पूर्णतेवर २०३१ पर्यंत आण्विक क्षमता २२ हजार४८० मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भविष्यात आणखी अणुऊर्जा प्रकल्पांचीही योजना आहे, असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन गावी होत असलेल्या १० हजार मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्पाचे काम जमीन अधिग्रहणानंतर संथपणे सुरू आहे. मागील काही वर्षात तर हे काम ठप्पच झाले होते. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र आता केंद्र शासनाने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील रिएक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment