शेतकरी राजा हे राज्याचे वैभव- मुख्यमंत्री ठाकरे

  



कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम गुरूवारी (१ जुलै) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मोहिमेंतर्गत ४० हजार गावांमधील ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. (CM Uddhav Thackeray Guidance Speech to Maharashtra Farmers) 

हेही वाचा: मोदींवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना प्रवीण दरेकरांचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

  • आज कृषी दिन व डॉक्टर दिन आहे. दोघांचेही महत्व आपल्याला या कोविड काळात कळले आहे.

  • शेतकरी आणि डॉक्टर हे दोघेही अन्नदाते आणि जीवनदाते आहेत

  • शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत. दुष्काळ, पूर, गारपीट कोरोना अशा संकटांच्या वेळी शेतकरी डगमगला नाही.

  • शेतकरी राजा हे राज्याचे वैभव आहे

  • गेले काही काळ निसर्ग बदलतो आहे

  • सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.


Comments