राजापूरात पावसाचा रूद्रावतार: अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटीशकालीन पुल वाहतुकीस बंद
राजापूरात पावसाचा रूद्रावतार: अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटीशकालीन पुल वाहतुकीस बंद
अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर, न. प. कडून होडीवाहतुक सुरू
शहर बाजारपेठेत सहाव्यांदा पुराच्या पाण्याचा वेढा; भातशेती पाण्याखाली
राजापूर-शीळ-चिखलगाव रस्ता पाण्याखाली
वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगण पाण्याखाली
राजापूर:-राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केल्याने गुरूवारी अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुर आला असून पुराच्या पाण्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामिण भागात भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर पुरस्थितीमुळे ग्रामिण भागातील एसटी फेऱ्या पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटीशकालीन पूल गुरूवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरात नगर परिषदेच्या वतीने होडीवाहतुक सुरू करण्यात आली आहे.गेल्या बारा दिवसांपासून राजापूर तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तर पुरामुळे अर्जुना नदीकिनाऱ्यावरील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राजापूर-शीळ मार्गे चिखलगाव रस्ता गेले बारा दिवस पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागातील लोकांची फार मोठी गैरसोय झाली आहे.सततच्या पुराचा सर्वाधिक फटका शहर बाजारपेठेला बसला आहे. या हंगामात तब्बल सहा वेळा पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. बुधवारी सांयकाळ पासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुरूवारी पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला. पुराच्या पाण्याने यावेळी जवाहरचौक मार्गे कुशे मेडीकल नवाळे कॉप्लेक्स पर्यंत तर बाजारपेठेत अभ्यंकर ग्राहक बाजार व मुन्शीनाका मार्गे उर्दुशाळेपर्यंत धडक मारली. तर मालपेकरोड पाण्याखाली गेला आहे. मात्र नगर परिषदेने पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने व्यापारी आणि नागरिकांनी खबरदारी घेत आपल्या मालाची आणि वस्तुंची सुरक्षीत ठीकाणी हलवाहलव केल्याने नुकसान टळले आहे. मात्र बाजारपेठेत पाणी शिरल्याने बहुतांशी दुकाने बंद राहिली आहेत.त्याचबरोबर शहरातील शिवाजीपथ, चिंचबांध, बंदधक्का, वरचीपेठ, कोंढेतड, आंबेवाडी, गुजराळी परिसरातील रस्ते पुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगण पाण्याखाली केले आहेत. तर शहर बाजारपेठेला जोडणारा कोंढेतड पुल, कै. वैशंपायन गुरूजी पुल, जवाहचौक नजीकचा नैनेसाहेब पुल, भटाळी येथील कै. वासुकाका जोशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागाचा शहर बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.ग्रामिण भागात गेल्या आठ ते दहा दिवसात अनेक ठिकाणी रस्ते खचणे, भुस्खलनाच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणी दळणवळण बंद पडले आहे. तर ग्रामिण भागातही नदी नाल्याने पुर आल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर तालुक्यातील परटवली-ओशिवळे ताम्हाणे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच कशेळी येथील गणपत राडये यांचा गोठा कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. तर हर्डी -रानतळे रस्ता पुन्हा खचला आहे. महाळुंगे बौध्दवाडी येथे बुध्दविहारावर झाड पडून नुकसान झाले आहे. परटवली ग्रामपंचायत इमारतीमध्ये तसेच सलाम बलबले यांच्या घरामध्ये अर्जुनाच्या पुराचे पाणी शिरले आहे.राजापूर शहरात गुरूवारी सकाळी पुराचे पाणी शिरताच तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर, नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पाहणी केली.
महावितरणकडून विजपुरवठा सुरूळीत सुरू ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
गेले बारा दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामिण भागात विजपुरवठयावर परिणाम होत आहे. वादळी वाऱ्यामुळे विजपुरवठा खंडीत होत आहे. मात्र महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी भर पावसातही जिवाची बाजी लावून विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेक भागात मोठया प्रमाणात पाऊस पडून विजपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment