मिरकरवाडा परिसरातील खैर ए उम्मत फाऊंडेशनच्या वतीने चिपळूण शहरात जाऊन तात्काळ मदत कार्य सुरु करण्यात आले

 





मिरकरवाडा परिसरातील खैर ए उम्मत फाऊंडेशनच्या वतीने चिपळूण शहरात जाऊन तात्काळ मदत कार्य सुरु करण्यात आले


रत्नागिरी-रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पूरामुळे व्यापारी, घरे, छोटी मोठी दुकाने, पाळीव प्राणी, शेती आदी सर्वांचेच मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अनेकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरातील खैर ए उम्मत फाऊंडेशनच्या वतीने चिपळूण शहरात जाऊन तात्काळ मदत कार्य सुरु करण्यात आले. घरे, दुकाने, रस्ते या ठिकाणची स्वच्छता, गरजूंना धान्य, जीवनावश्यक वस्तू, जेवण आदी मदत करण्यात येत आहे. या कार्याबद्दल येथील आमदार शेखर निकम यांनी देखील कौतुक केले आहे.



..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments