ओ.बी.सी.जागे होतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल: युयुत्सु आर्ते

 


ओ.बी.सी.जागे होतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल: युयुत्सु आर्ते


रत्नागिरी:-पंचायत राज कायद्याच्या अस्तित्वापासून चालू असलेले ओ.बी.सी. आरक्षण रद्द झाले ही आरक्षण विरोधकांची चाल असून ही चाल लक्षात घेणे आवश्यक आहे. ओ.बी.सी. नी वेळीच जागे होऊन या विरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. अन्यथा ओ.बी.सी. जागे होतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल अशी भीती देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी व्यक्त केली आहे. सुप्रिम कोर्टाने अनेक वेळा सांगूनही केंद्र सरकारने हेतूपुरस्सर ओ.बी.सी.ची स्वतंत्र जनगणना न केल्यामुळे ओ.बी.सी. आरक्षण रद्द झाले आहे. ओ.बी.सी. स्वतंत्र जनगणनेमुळे ओ.बी.सी.ची संख्या लक्षात येणार असल्याने अशा प्रकारची जनगणना न करण्याचे षडयंत्र आहे. ओ.बी.सी.ची स्वतंत्र जनगणना होण्यासाठी सर्वांनी आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी सर्व ओ.बी.सी.व्यक्ती व संघटनांनी संघटितरित्या आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करणे व आता ओ.बी.सी. आरक्षण रद्द करणे हा फार मोठ्या कटाचा भाग असून तो उधळवणे आवश्यक असल्याचे मत आर्ते यांनी व्यक्त केले आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments