सत्तेतील दोन वजनदार मंत्र्यांनी बदलीची शिफारस करुनही महसुल प्रशासनाची मगरमिठी?

 







सत्तेतील दोन वजनदार मंत्र्यांनी बदलीची शिफारस करुनही महसुल प्रशासनाची मगरमिठी?


रत्नागिरीतील भूमी अभिलेख कार्यालयातील त्या बड्या अधिका-याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बदली का करत नाहित?


रत्नागिरी:-सत्तेतील दोन वजनदार मंत्र्यांनी बदलीची शिफारस करुनही महसुल प्रशासनाची मगरमिठी?का? असा सवाल उपस्थीत झाल्यास काहिच वावगे ठरणार नाही. रत्नागिरीतील भूमी अभिलेख कार्यालयातील एका बड्या अधिका-याच्या बदलीबाबत मंत्री अनिल परब व मंत्री उदय सामंत यांनी संबंधित प्रशासकीय विभागाकडे बदलीची शिफारस केली होती. मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या बड्या अधिका-याची बदली का करत नाहि असा सवाल उपस्थीत केला जात आहे.रत्नागिरी भूमी अभिलेख कार्यालयातील एका बड्या अधिका-या मनमानी कारभाराबाबत शेतकरी, जनता, लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांनी शासनदरबारी अनेक तक्रारी नोंद केल्या आहेत. या प्रकरणी पालकमंत्री अनिल परब यांनी देखील बदलीची शिफारस केली होती. याच विभागातील एका कर्मचा-याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही तक्रार दिली होती. मात्र अद्याप या अधिका-याच्या बदलीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी देखील त्यांच्या बदली बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन केले आहे. आता मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे नेमकी काय कार्यवाही करतात हे पहावे लागेल.  


.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments

  1. खूप छान सर जी

    Very Good Reporting

    पुढील वातचली साथी खुप खुप सुभेच्छया

    ReplyDelete

Post a Comment