राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात आयलॉग कंपनीच्या जमीनीची प्रशासकीय स्तरावर चौकशी होऊन शेतक-यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समीर शिरवडकर यांनी केली आहे.




राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात आयलॉग कंपनीच्या  जमीनीची प्रशासकीय स्तरावर चौकशी होऊन  शेतक-यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समीर शिरवडकर यांनी केली आहे.


रत्नागिरी:- जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात आयलॉग कंपनीने प्रकल्पासाठी सुमारे सहाशे ते साडेसहाशे हेक्टर जमीन अधिग्रहीत केली आहे. ही जमीन 2004 आणि 2005 साली खरेदी झालेली आहे. शासन नियमाप्रमाणे जमीन अधिग्रहीत केल्यापासून पाच वर्षात त्या जमिनिवर विकास कामे सुरु करायची असतात. तशी कोणतीही कामे जर या जमिनिवर झाली नाहित तर ती जमीन शासन आपल्या ताब्यात घेऊ शकते किंवा शेतक-यांना परत करु शकते. मात्र कंपनीने शेतक-यांची पुरती फसवणूक केली आहे. असे मत येथील माहीती अधिकार कार्यकर्ता समीर शिरवडकर यांनी व्यक्त केले आहे. यासंबंधी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची प्रशासकीय स्तरावर चौकशी होऊन येथील शेतक-यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समीर शिरवडकर यांनी केली आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025




Comments