रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; रत्नागिरीमध्ये अपघात




रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू;  रत्नागिरीमध्ये अपघात 



रत्नागिरी:-रेल्वेतून पडून तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील भाेके रेल्वे स्थानकादरम्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अक्षय लक्ष्मण नारकर (२८, रा. नीलमणी आर्केड, गयाळवाडी फाटा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.याबाबत त्याचा लहान भाऊ अमर याने फिर्याद दिली. अक्षय हा सकाळी कामासाठी चिपळूण येथे गेला हाेता. उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने त्याच्या भावाने माेबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्याने उचलला नाही. दरम्यान, भाेके स्टेशन मास्तरांनी पाेलिसांना रुळावर मृतदेह आढळल्याची माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या माेबाईलवरून संपर्क साधला असता ताे अमर याला लागला. ताे घटनास्थळी आल्यानंतर हा मृतदेह अक्षयचा असल्याचे निश्चित झाले. याबाबत ग्रामीण पाेलीस तपास करत आहेत. 


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments