हातखंबा येथील तिहेरी अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

 



 हातखंबा येथील तिहेरी अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल


 रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ तीन वाहनाना धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास घडली होती. पांडुरंग अण्णासो माळी (२८, रा. सांगोला, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात कंटेनर चालक परमार्थ गल्लर यादव (४३, रा. उत्तरप्रदेश) याने तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments