विनाकारण घराबाहेर पडताय मग सावधान… तर तुमची कोरोना चाचणी होणार




 विनाकारण घराबाहेर पडताय मग सावधान… तर तुमची कोरोना चाचणी होणार



रत्नागिरी:- जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली जाणार आहे. तसेच त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक फाईन बसवण्यात येणार आहे. किराणा खरेदीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडावा आणि जवळच्याच दुकानातून किराणा खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रत्येकाच्या राशनची जबाबदारी शासनाने घेतली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सी साठीच घराबाहेर पडा असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या