नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आज शहरात पाणी नाही
नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आज शहरात पाणी नाही
रत्नागिरी : शिवजयंतीच्या दिवशीच रयतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा पराक्रम रत्नागिरी नगरपालिकेने आज केला आहे. काल सायंकाळच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे शीळ धरण येथील वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे पाणी खेचण्यासाठी जनरेटर चालू करण्यात आले. मात्र रात्री 2 वाजता या जनरेटर मधील डिझेल संपल्याने साळवी स्टॉप येथील टाकीत पाण्याची पुरेशी पातळी होऊ शकली नाही. जनरेटर च्या ठिकाणी आवश्यक डिझेलचा साठा नसल्याने लाखो रुपये खर्च करून घेतलेले जनरेटर काहीच काम करू शकले नाहीत. त्यामुळे आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी शहरातील जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागले असल्याची माहिती मिळत आहे.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment