संजय राठोड राजीनामा देत नाही, तोपर्यंत.....

 संजय राठोड राजीनामा देत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही; भाजप आक्रमक



मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. त्यातच या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजप कडून मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेत नाहीत, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. 


भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे.



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments