गावखडी ते पावस रस्त्याचे नूतनीकरण
पावस:गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावखडी ते पावस या सागरी मार्गाच्या नूतनीकरणास प्रारंभ झाल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . गावखडी ते रत्नागिरी या सागरी मार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणाकरिता पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता . त्या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारी २०१९ मध्ये पावस येथील निर्धार मेळाव्यात करण्यात आले होते . मात्र नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला नव्हता .
मे २०२० मध्ये रत्नागिरी ते पावस या मार्गाचे काही प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले . परंतु पहिल्या पावसाळ्यातच त्यावर खड्डे पडण्यास सुरवात झाली . साहजिकच वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण बनले होते . मागील महिन्यात या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे खडी रस्त्यावर टाकण्यात आली . त्याचा फटका एका तरुणाला सहन करावा लागला . मात्र आता पुन्हा गावखडी ते पावस हा सागरी मार्गावर डांबर टाकण्यास सुरवात झाली आहे
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment