फास्टॅग नाही तर स्लोटॅग झालाय ! टोल प्लाझावर वाईट अनुभव - गीतकार संदीप खरे

Sandeep Khare
(Photo Credit Google)
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य केला आहे. टोल प्लाझावर वाहनांच्या लागणाऱ्या रांगापासून सुटका करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात यात तांत्रिक अडचणी येत असल्याने पूर्वीसारखाच वेळ जात असल्याचे काहींचा अनुभव आहे. असाच अनुभव कवी आणि गीतकार संदिप खरे यांना आला आहे. या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कवी, गीतकार संदीप खरे यांना हा अनुभव पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर आला आहे. "माझ्या गाडीवरील FASTag स्कॅन न झाल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याने गाडी थांबवली. त्यानंतर एका छोट्या मशीनने तो टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल असं सांगण्यात आलं. यात टोल 75 आणि दंड 75 रुपये अशी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे फास्टॅग असल्याने मी भरणार नसल्याची भूमिका घेतली. त्यावर तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. काही वेळाने मॅनेजर आला, त्यानेही दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. नंतर तो टॅग स्कॅन झाला." मात्र, या सर्व घडामोडींमध्ये माझे 10 मिनीटे वाया गेले. यावर संबंधीत प्रशासनाने काहीतरी उपाय काढण्याची विनंती खरे यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देण्याचंही ते बोलले.
Comments
Post a Comment