"मुंबई महापालिकेत कंत्राटदार रॅकेट; वकिलाने केली लेखी तक्रार"
"मुंबई महापालिकेत कंत्राटदार रॅकेट; वकिलाने केली लेखी तक्रार"
मुंबई महापालिकेच्या आयटी विभागातील कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची लेखी तक्रार राजेश शर्मा नावाच्या वकिलाने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. त्यावर आयुक्तांनी चौकशी सुरू केली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
राजेश शर्मा या स्वतःला वकील म्हणणवणाऱ्या व्यक्तीने आयुक्तांना, तसेच सर्व गटनेत्यांना १७ पानांचे लेखी पत्र पाठवले असून, त्यात गेल्या तीन वर्षांतील २५०हून अधिक निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. काही कंपन्यांचे मालक, कंत्राटदार हे पालिकेची 'सॅप' यंत्रणा हाताळणाऱ्या आयटी विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंत्राट कामांमधील निविदेतील बोली जाणून घेतात. ती माहिती दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन त्याप्रमाणे कमी बोली लावून निविदा भरून कामे मिळवत आहेत, असा धक्कादायक प्रकार या पत्रात नमूद केला आहे.
- हाती लागेल मोठे रॅकेट
याप्रकरणी आपण पालिका आयुक्तांकडे या भ्रष्टाचाराचे फोरेन्सिक विभागामार्फत ऑडिट करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दिली. पालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटदार आणि आयटी विभागातील कर्मचाऱ्यांचे रॅकेट आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मेहता पालिकेतून गेल्यानंतर ही चौकशी थंडावली आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, यातून मोठे रॅकेट हाती लागेल, असे राजा यांनी सांगितले.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment