ताबा पावती झाली मात्र जमीनधारक अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत


रत्नागिरी-मि-या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनींचे भुसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रथम भुसंपादन होऊन निवाडा रक्कम जाहीर झाली. रत्नागिरी तालुक्यातील साठरे, बाजारपेठ, पाली, खानू येथील जमीनधारकांकडून सप्टेंबर महिन्यात ताबा पावती शासनाने करुन घेतली; मात्र यातील काही ठराविक जमीनधारकांचीच मोबदला रक्कम बँक त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. 

उर्वरीत खातेधारक गेले दोन महिने प्रतिक्षेत असून प्रांत कार्यालयाकडून कोरोनाचे कारण दिले जात आहे. गेले दोन महिने हे वाटप का थांबविण्यात आले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा भुसंपादन अधिकारी यांनी उर्वरीत मंजूर निवाडा रक्कमेतील मोबदला वाटप तात्काळ करण्याची मागणी जमीन धारकांकडून होत आहे.

Comments