अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ



रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग नंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 


मुंबई पोलीसांनी कलम 353 नुसार अर्णव गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे यानुसार केला गुन्हा दाखल केला आहे. 
आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता.  या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  मिळालेल्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेलं आहे.

Comments