महावितरण ची वीज समस्या निवारणासाठी एक गाव एक दिवस मोहीम
महावितरण रत्नागिरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री बेले यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक दिवस मोहीम सुरू करण्यात आली असून या अंतर्गत उपविभाग रत्नागिरी ग्रामीण येथील उपकार्यकारी अभियंता श्री ओंकार डांगे यांनी पावस शाखा कार्यालय येथे राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
या वेळी चांदोर या गावातील वीज ग्राहकांच्या वीज तारा, खांब या बद्दल असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण पणे खराब झालेले 12 खांब त्वरित बदलण्यात आले . याशिवाय 14 आधार stay नव्याने टाकण्यात आले व खाली आलेल्या तारा ताणण्यात आल्या.
याशिवाय वीज बिल तक्रारी निवारण करण्यासाठी लेखा विभागातील अधिकारी उपस्थित ठेवण्यात आले होते आणि सर्व ग्राहकांच्या बिल संबंधी तक्रारी निवारण करण्या त आल्या . गावातील एकूण 42 नादुरुस्त मीटर बदलण्यात आले.
ही सर्व कामे एकाच दिवशी करण्यासाठी अन्य शाखा कार्यालयातील मिळून 22 तांत्रिक कामगार, मे. आस्था इलेक्ट्रिकल, मे. डांगे इलेक्ट्रिकल व एस. आर. इलेक्ट्रिकल या संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांच्या नेतृत्वाखाली श्री शोण चारोस्कर, हृषिकेश करंबेळकर, श्री कळेकर सौ. माने व कु. राठोड हे अभियंता व सहायक लेखापाल श्रीमती फडके,रघुनाथ पालकर असे सुमारे 75 कर्मचारी व अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते.
या मोहिमेमुळे गावातील वीज ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल ऍप,तसेच ऑनलाईन बिल भरणा प्रक्रियेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
ग्रामस्थांच्या वतीने सरपंच श्री. कोकरे यांनी कार्यकारी अभियंता श्री बेले यांचं या वेळी विशेष कौतुक करून सत्कार केला. या मोहिमेबद्दल मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर यांनी समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या आदर्श लोकाभिमुख मोहिमा कोकण परिमंडळ अंतर्गत राबविण्याचे निर्देश सर्वच कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.



Comments
Post a Comment