ना. उदय सामंतांनी मेडिकल उभारणीसाठी सूत्र हलवली

 


सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरीत देखील सुसज्ज मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी ना. उदय सामंत आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. या नोव्हेंबर पर्यंत सर्व तांत्रिक बाबींना मंजुरी मिळविण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण झाल्यास २०२१-२२ या वर्षासाठी मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार असून हा जिल्हा शक्षणिक दृष्ट्या देखील प्रगत होण्यासाठी हातभार लागणार आहे.

रत्नागिरीत मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरु व्हावे, त्या संदर्भातील तांत्रिक बाबींना मंजुरी जलद गतीने मिळावी म्हणून ना. उदय सामंतांनी एक स्वतंत्र टीम कामाला लावली आहे. यात या कामात वाकबगार असणाऱ्या दिग्गज अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. या टीमचे प्रमुख डॉ. विजय शेगोकर आपल्या शाकार्यांसह रात्न्गीरीत दाखल झाले आहेत. दोन दिवसातच त्यांनी मेडिकल कॉलेज साठी जागेची निवड करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात डीन साठी एक स्वतंत्र कार्यालय सुरु केले आहे. डॉ. विजय शेगोकर यांनी महारष्ट्रात सुमारे ७ ते ८ मेडिकल कॉलेज उभारणीत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

मेडिकल कॉलेज साठी जागेची निवड करून कॉलेज सुरु करण्यासाठी सुमारे २५ एकर जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात रत्नागिरीत विविध जागांची पाहणी करण्यात आली. यानुसार मिरजोळे येथील ७.५ एकर व दांडेआडम येथील १५ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्या संदर्भाचे पत्र तहसीलदारांनी सबंधित कार्यालयाला दिले आहे. या कॉलेज साठी जिल्हा रुग्णालय देखील ३ वर्षासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.

पुढील वर्षी प्रवेश प्रक्रियेला होणार सुरुवात झाली असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. विजय शेगोकर यांची टीम झपाट्याने कामाला लागली आहे. नोव्हेंबर पर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊन २०२०-२१ या वर्षाच्या कोलेजच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Comments